Wednesday, 21 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस नववा



आपल्या सगळ्यांना पांडव व कौरवांची गोष्ट माहीतच आहे. धृतराष्ट्राच्या अतिमहत्वकांक्षेमुळे व आंधळ्या प्रेमामुळे उन्मत्त झालेले कौरव आणि लहानपणीच वडीलांचे छत्र हरवल्यामुळे पण महत्वकांक्षी कुंतीने प्रेमाने, सहृदयतेने वाढवलेले पांडव यांच्यात झालेले युध्द म्हणजे महाभारत.
अनेक नामुष्कीचे प्रसंग येवूनसुद्धा, युध्द थांबवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पांडवांनी कौरवांबरोबर युध्द पुकारले. भगवान श्रीकृष्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ह्या सर्वांची मात्र पंचाईत झाली होती की कोणाच्या बाजूनी लढायचे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ह्यांनी ज्यांची चाकरी करतो त्यांच्याच म्हणजे कौरवांच्या बाजूनी युद्ध करायचे ठरवले. भगवान श्रीकृष्ण यांनी मात्र अर्जुन आणि दुर्योधनाला पर्याय सांगून ठरवायला सांगितले. माझी औक्षयणी सेना एकीकडे आणि मी एकटा एकीकडे राहीन असा पर्याय दिला. अर्जुन आणि दुर्योधन यांनी आपापल्या स्वभावाप्रमाणे निर्णय घेतला. अर्जुनाने सांगितले की देवा तू माझे सारथ्य कर आणि दुर्योधन प्रचंड सेना घेऊन खूप खुश झाला. पुढे युद्धाच्यावेळी मात्र अर्जुनाच्या मनात नाही-नाही त्या प्रश्नांनी घर केले. मोहग्रस्त झालेला अर्जुन लढायला तयार होईना. भगवान श्रीकृष्ण यांच्या लक्षात आले की प्रचंड भावनावश झाल्यामुळे अर्जुन असा वागतोय. अर्जुनाच्या प्रश्नाचे(problem) कारण(root cause) त्यांना कळले. मग गीतेला प्रारंभ झाला. गीतेतील उपदेशामुळे ( निश्चयात्मिका बुद्धी ) अर्जुनाचा मोह नष्ट झाला, युद्ध झाले व तो विजयी झाला हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच.

मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या समूहाला अंतःकरण म्हणतात असे आपण काल पाहिले. मनाचा रोल केवढा मोठा आहे हेही पहिले. गेले ८ दिवस अहंकार कमी का व कसा करायचा तेही पहिले. आज मना एवढाच मोठा रोल बुद्धी कशी निभावते हे पाहूया. शास्त्रामध्ये बुद्धीला सारथी म्हटले आहे. खालील उदाहरण कळायला खूप सोपे होईल.
आपल्या शरीराला रथाची उपमा दिली आहे. ह्या रथाचे घोडे म्हणजे आपली इंद्रिये. नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ हि पंचज्ञानेंद्रिये आहेत ज्यायोगे आपल्याला बाहेरच्या जगाची माहिती मिळत असते. इंद्रियांचा direct संबध बाहेरच्या जगाशी येत असल्यामुळे हे घोडे सारखे बाहेरच्या विश्वात उधळलेले असतात. पण ह्यांचा लगाम म्हणजे मन. इंद्रियांना काबूत ठेवायचे काम मनाचे असते. बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करायचे काम मनाचे असते. पण नुसते लगाम चांगले असून चालत नाही तर लगाम खेचणारा सारथी उत्तम असायला लागतो. शास्त्रामध्ये बुद्धीला सारथी म्हटले आहे. कधी आणि किती लगाम खेचायचे हे काम जर बुद्धीने बरोबर केले नाही तर रथ सुसाट सुटेल आणि नको तिकडे जाईल. त्यामुळे रथस्वामी कितीही पराक्रमी असला तरी काही उपयोग नाही. युद्धातील विजय हा सारथ्यावर अवलंबून असतो. अर्जुन कितीही पराक्रमी असला तरी तो श्रीकृष्ण सारथी नसते तर जिंकू शकला नसता.
आपल्या आयुष्यात बुद्धीचा रोल प्रचंड महत्वाचा आहे. इंद्रिय आणि मन(संकल्प-विकल्प) यांचा स्वभावच आहे confuse करायचा पण जर बुद्धीने बरोबर निर्णय घेतला तर ती मनाला ताब्यात ठेवू शकते.
बुद्धी फक्त निर्णय घेत नाही तर तिचे बाकीचे पैलू म्हणजे चांगल्या आणि वाईट याची समज( perception), तारतम्य(discrimination), सद्सद्विवेक, तर्कसंगती(rationality), सर्व विषयाचे आकलन(comprehension), एकदा ठरले की त्याप्रमाणे अंमलबजावणी (mindfulness), प्रसंगावधान(presence of mind), आधीच्या प्रसंगातून घेतलेला बोध(understanding) आणि त्यातून आलेले शहाणपण(wisdom) असा आहे.

आपण सगळेच बरेचदा अर्जुन(मोहग्रस्त) होतो. आपल्या आयुष्यात कित्येक महत्वाचे आणि अवघड प्रसंग येतात तेंव्हा आपल्या मनाची confused, unstable अशी अवस्था असते. कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे तर अजूनच वाईट होते. तेंव्हा जर सद्सदविवेकबुद्धीने (observe-analyze-discriminate-decide-act) वागलो तर चांगला मार्ग नक्की निघेल.
समाजाचे अधःपतन हे स्वैर आणि एककल्ली विचारामुळेच होत आहे. सद्सदविवेकबुद्धी न वापरल्यामुळे होत आहे. खरतर माणसाला माणूसपण हे बुद्धी मुळेच आले आहे नाहीतर माणूस आणि पशू ह्यात फरक तो काय राहिला?

अर्जुनाने जसे आपले सारथ्य भगवान श्रीकृष्णकडे दिले आणि विजयी झाला तसेच आपणही आपले सारथ्य सद्सदविवेकबुद्धी कडे देवूया.

दिवस नववा: 


सातवी आदिशक्ती: 'सिद्धीदात्री'- सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी देवी (अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.)
रूप: चार भुजाधारी - तिच्या हातात कमळाचे फूल, शंख, गदा आणि चक्र आहे.
देवी: श्री सिद्धीदात्री
देवीचे वाहन: सिंह
आजचा रंग: जांभळा
मंत्र: 
सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धीदा सिद्धीदायिनी।।


 आजचे जांभळे मंडल

No comments:

Post a Comment