Thursday, 22 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - विजयादशमी


दिवस दहावा - विजयादशमी - दसरा
आज अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजया दशमी म्हणून उत्साहाने साजरा केला जातो.
आपल्या सर्वांना नवरात्राची कथा माहिती आहे, ती अशी की रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले, म्हणून दशहरा (दहा तोंडे असलेल्या रावणाला हरवले - १० अवगुणांचे प्रतिक - काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, स्वार्थ, अहंकार, आसक्ती व हिंसा) म्हणतात.
अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते, काही केल्या देव, दानवांचा पराभव करू शकत नव्हते. तेंव्हा सर्व देवानी देवीला आवाहन केले व देवीचा विजय व्हावा म्हणून देव अनुष्ठानाला बसले. महिषासुर सारख्या बऱ्याच बलाढ्य  असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने असुरांना(वाईट प्रवृत्ती) मारले.
दोन्ही कथांमध्ये चांगल्या व वाईट प्रवृत्ती यांचा लढा होता. शेवटी चांगल्या प्रवृतीचा नेहमीच विजय होतो असे आश्वासन दिले आहे. नवरात्रीमध्ये पहिले ३ दिवस शक्ती, नंतरचे ३ दिवस लक्ष्मी आणि शेवटचे ३ दिवस सरस्वतीची पूजा केली. त्यांना आवाहन केले. आमच्यातल्या शक्ती, लक्ष्मी आणि सरस्वती त्यांना जागृत  केले व आमच्या मध्ये असलेल्या तामसी आणि राजसी गुणांना कमी कर व सात्विक गुण वाढव अशी आराधना केली. साधनेने मन एकाग्र व स्थिर झाले. मनाचा पूर्ण ताबा सद्सद्विवेकबुद्धी ला दिला. एकदा का असे झाले की तो आनंदाचा दिवस आला. विजयाचा दिवस आला.
|| हरी ओम तत्सत || श्री कृष्णार्पणमस्तु ||

आपण सर्वचजण आनंदयात्री होऊया हीच त्या आदिशक्तीकडे प्रार्थना




No comments:

Post a Comment