आपल्या सर्वांना नवरात्राची कथा काय हे आपल्या
आईवडिलांनी सांगितले, ते असे की रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी
रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने
लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की
देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते आणि काही केल्या देव, दानवांचा पराभव करू शकत
नव्हते. तेंव्हा सर्व देवानी देवीला आवाहन केले व देवीचा विजय व्हावा म्हणून देव
अनुष्ठानाला बसले. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध
करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले.(तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू
लागले).
प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते व दीप अखंड तेवत ठेवला
जातो. या दिवसापासून संत-महंतांच्या योग साधनेला सुरवात होते.
कथेमधून
आपण असा बोध घेऊ शकतो की देव आणी दानव हे symbolic आहेत. जश्या बाहेर चांगल्या आणि दृष्ट प्रवृत्ती आहेत तश्याच आपल्या आतही चांगले आणिवाईट गुण आहेत. नेहमी
चांगल्या व दृष्ट प्रवृत्ती यांचा लढा चालू असतो. जसे देवानी देवीला पाचारण केले
तसेच आपण आपल्या आतल्या देवीला(शक्तीला) पाचारण करायचे आहे. आपणच आपल्या वाईट
गुणांवर विजय मिळवायचा आहे. सगळ्यात मोठा असुर महिषासुर
(म्हणजे आळस) त्याला मारायला शक्तीला आळवायचे आहे. नवरात्रामध्ये शारीरिक, वाचीक,
मानसिक शुद्धीसाठी वेगवेगळे नेम केले जातात.( ते का करायचे आणी बरेच काही पुढच्या ९
दिवसात आपण पाहू ). त्याप्रमाणे मी सुद्धा नवरात्रीतील दिवसाप्रमाणे माहिती लिहायचा व मंडला काढायचा नेम केला आहे.
पहिली आदिशक्ती: 'शैलपुत्री' (पर्वतराज
हिमालयाची मुलगी)
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता
कमळाचे फूल आहे
वाहन : नंदी
देवी: श्री दुर्गादेवी
देवीचे तत्व: पृथ्वी
तत्वाशी संबधित आकार: ३ पाकळ्या
साधना: मन 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात
मंत्र :
वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ||
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ||
नवरात्रीमधील दिवसाचा रंग व तत्वाशी संबधित आकार हे घेऊन मंडला काढला आहे.
No comments:
Post a Comment