Saturday, 17 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस पाचवा



प्रकृती ही आठ गोष्टीनी बनलेली असते म्हणून तिला अष्टधा प्रकृती म्हणतात - पंचमहाभूते+त्रिगुण. प्रकृतीमध्ये जन्मलेला प्रत्येकजण( मनुष्य, प्राणी, वनस्पती) हा तीन गुणांनी बनलेला असतो - सत्व, रज आणि तम. भगवंताची करणी अगाध आहे की जरी सर्वजण अष्टधा प्रकृतीचे असले तरी प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकजण जन्माला येताना ह्या ३ गुणांचे combination घेऊन येतो व त्या गुणांच्या प्रभावाप्रमाणे वागतो. आपण आजूबाजूला पाहिले असता आपल्या लक्षात येईल की माणसांच्या आवडीनिवडी, स्वभाव, विचार आणि वागणे हे त्रिगुणांच्या combination वर अवलंबून असतात.
सर्वसाधारणपणे ह्या त्रिगुणांचा प्रभाव असा दिसून येतो-
१. सात्विक:  दयाळू, कनवाळू, दुसऱ्याचा विचार करणारे, संवेदनशील, शांत, निर्गर्वी, काहीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, समाधानी, आनंदी, निर्भयी, क्षमाशील आणि उत्साही
२. राजस: सतत काहीतरी करावे वाटणारे, चंचल, शूर, पराक्रमी, गर्विष्ठ, मत्सरी, अपेक्षा ठेऊन मदत करणारे, लीडर, असंतुष्ट, सगळ्या गोष्टीत आसक्ती आणि प्रत्येक गोष्टीची कामना करणारे
३. तामस: आळशी, स्वार्थी, कावेबाज, कुणालाही मदत न करणारे, फक्त स्वतःचा विचार करणारे, निरुत्साही आणि सतत दुःखी
(हे वर्णन ठोकळमनाने दिले आहे - सगळे वर्णन करणे इथे शक्य नाही)
१००% सात्विक कुणीच नसते. सगळेजण ह्यापैकी २ व ३ गुणांचे combination घेऊन जन्मतात. प्राणी आणि वनस्पती यांना जन्मल्यावर ह्या combination मध्ये बदल करता येत नाही पण भगवंताने हे स्वातंत्र फक्त माणसाला दिले आहे. जन्माला येताना कसाही आला तरी बुद्धी असल्यामुळे आपल्या स्वभावात, वागण्यात त्याला बदल करता येतो. (आपल्या गुणांचा त्याग करता येत नाही) जेणेकरून रज आणि तमोगुण कमी करून perfection च्या दिशेने म्हणजे त्याला सात्विक होता येते. एकावेळी एका गुणाचा प्रभाव आपल्यावर असतो. आपण स्वतःचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की आपण काही प्रसंगी चांगले वागतो तर काही प्रसंगी नाही ह्याचे कारण जेंव्हा आपण चांगले वागतो तेंव्हा आपल्यावर सात्विक गुणाचा प्रभाव असतो. आपण साधना ह्याच गोष्टींकरता करायची की जेणेकरून सात्विक गुण नेहमीच बाकी दोन्ही गुणांना suppress करेल. खरेतर जीवन जगायला ह्या तिनही गुणांची गरज आहे.
सात्विक होण्यासाठी आपल्यात असणाऱ्या सात अवगुणांना weak करावे लागेल - कामना, क्रोध, मद, मोह, मत्सर, आसक्ती आणी अहंकार
नवरात्रीमध्ये साधना पहिले ३ दिवस शक्ती(तमास गुणांवर विजय), नंतरचे ३ दिवस लक्ष्मी(राजस गुणांवर विजय आणि शेवटचे ३ दिवस सरस्वती( सत्वगुण वृद्धी) साठी करायची आहे.

काल सांगितल्याप्रमाणे, जर पूर्ण आनंद, समाधान आणि शांती हवी असेल म्हणजे नारायणाची प्राप्ती करायची असेल तर आधी सात्विक होण्याकडे आणि नंतर निर्गुण होण्याकडे वाटचाल करावी लागेल.

दिवस पाचवा:

पाचवी आदिशक्ती: 'स्कंदमाता
रूप: चारभुजाधारी - दोन हातामध्ये कमळ, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हाताने स्कंदाला म्हणजे कार्तिकेयाला धरले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
रंग : करडा- ग्रे
तत्वाशी संबधित आकार: चक्र
साधना: मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया|
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी||

नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: करडा - ग्रे ||  गोल: पाचवा ||  आकार: चक्र


No comments:

Post a Comment